शरद पवारांचे आत्मचरित्र | Sharad Pawar Biography in Marathi

शरद पवारांचे आत्मचरित्र | Sharad Pawar Biography in Marathi

शरद गोविंदराव पवार एक वरिष्ठ भारतीय राजनेता आहेत जे नॅशनॅलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीचे संस्थापक आणि अध्यक्ष देखील आहेत. ते तीन वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. एका प्रभावशाली नेत्याच्या रूपात आपली ओळख बनवणारे शरद पवार केंद्र सरकारमध्ये रक्षा आणि कृषी मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. ते याआधी काँग्रेस पार्टीमध्ये होते परंतु सन 1999 मध्ये त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. सध्याच्या घडीला ते राज्यसभेमध्ये सांसद आहेत आणि आपल्या पार्टीचे नेतृत्व करत आहेत. राष्ट्रीय राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील त्यांची पकड मजबूत आहे.

राजकारणासोबतच ते क्रिकेट प्रशासनासोबत देखील जोडलेले आहेत. ते 2005 ते 2008 दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड चे अध्यक्ष आणि त्यानंतर सन 2010 ते 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष होते. 2001 ते 2010 पर्यंत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे देखील अध्यक्ष होते आणि जून 2015 मध्ये त्यांना पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

  • पूर्ण नाव – शरद गोविंदराव पवार
  • जन्म: 12 डिसेंबर, 1940, पुणे, महाराष्ट्र
  • कार्यक्षेत्र: राजनेता, नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी चे संस्थापक आणि अध्यक्ष, महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री.
Sharad Pawar Biography in Marathi
Sharad Pawar Biography in Marathi

प्रारंभिक जीवन । Early Life of Sharad Pawar in Marathi

शरद गोविंदराव पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये झाला होता. त्यांचे वडील गोविंदराव पवार बारामतीच्या कृषी सहकारी संघामध्ये कार्यरत होते आणि त्यांची आई शारदाबाई पवार कातेवाडी (बारामती पासून दहा किलोमीटर लांब) मध्ये परिवाराच्या शेतीची देखरेख करायची. शरद पवार यांनी पुण्याच्या विश्वविद्यालय मधून संबंध बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मधून शिक्षण घेतले.

राजकीय जीवन । Political life of Sharad Pawar in Marathi

महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना शरद पवारांचे राजकीय गुरु मानले जाते. सन 1967 साली शरद पवार काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर बारामती विधानसभा क्षेत्रामधून निवडून येऊन पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये पोहचले. 1978 मध्ये पवार यांनी काँग्रेस पार्टी सोडली आणि जनता पार्टीच्या सोबत मिळून महाराष्ट्रामध्ये एक गटबंधन सरकार बनवले आणि पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1980 मध्ये सत्तेमध्ये परत आल्यानंतर इंदिरा गांधी सरकारने महाराष्ट्रातल्या या सरकारला बरखास्त केले. सन 1980 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पार्टीला संपूर्ण बहुमत मिळाले आणि ए आर अंतुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पार्टीचे सरकार बनले.

सन 1983 मध्ये शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि आयुष्यात पहिल्यांदाच बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांनी 1985 मध्ये विधानसभेची निवडणूक जिंकली आणि राज्याच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी लोकसभेच्या जागेचा राजीनामा दिला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ( सोशलिस्ट ) ला 288 पैकी 54 जागा मिळाल्या आणि शरद पवार विरोधी नेते म्हणून निवडले गेले.

सन 1987 मध्ये शरद पवार काँग्रेस पार्टीमध्ये परत आले. जून 1988 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री असलेले राजीव गांधी यांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांना केंद्रीय वित्तमंत्री बनवले यानंतर शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले. सन 1989 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या एकूण 48 जागांपैकी काँग्रेसला 28 जागांवर विजय मिळाला. फेब्रुवारी 1990 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या गटबंधन सरकारने काँग्रेसला जोरदार टक्कर दिली आणि काँग्रेस पार्टीने 288 जागांपैकी 141 जागांवर विजय तर मिळवला परंतु बहुमत सरकार बनवू शकले नाही. परंतु शरद पवार यांनी 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आणि ते मुख्यमंत्री झाले.

सन 1981 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रधानमंत्री राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली यानंतर पुढील प्रधानमंत्री म्हणून एनडी तिवारी, नरसिंहराव यांच्यासोबतच शरद पवार यांचे नाव सुद्धा समोर येऊ लागलं. परंतु काँग्रेस संसदीय दलाने नरसिंहराव यांना प्रधानमंत्री म्हणून घोषित केले आणि शरद पवार यांना रक्षा मंत्री बनवले गेले. मार्च 1993 मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 6 मार्च 1993 ला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर लगेचच सहा दिवसांनी म्हणजेच 12 मार्च 1993 ला मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले ज्यामध्ये शेकडो लोक मरण पावले.

सन 1993 नंतर शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचार आणि अपराधींना मदत केल्याचे आरोप लागले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपयुक्त जीआर खैरनार यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचार आणि अपराधींना वाचवण्याचे आरोप लावले. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील महाराष्ट्र वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी केली आणि उपोषण केले. विरोधी पक्षाने देखील पवारांवर बरेच आरोप केले. या सर्व गोष्टींमुळे पवार यांच्यासोबत असणारे इतर पक्ष देखील नाराज झाले.

सन 1995 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि बीजेपी गटबंधन सरकारने तब्बल 138 जागांवर विजय मिळवला परंतु दुसरीकडे काँग्रेस पार्टीला केवळ 80 सीटांवर विजय प्राप्त करता आला. शरद पवार यांना राजीनामा द्यावा लागला आणि मनोहर जोशी महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले. शरद पवार 1996 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राहिले आणि लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला.

1988 च्या मध्यवर्ती निवडणुकांमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सहकारी दलांनी महाराष्ट्रामध्ये 48 जागांपैकी 37 जागेवर विजय मिळवला. शरद पवार बाराव्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून निवडले गेले.

सन 1999 मध्ये जेव्हा बारावी लोकसभा भंग करण्यात आली आणि निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा शरद पवार तारीख अनवर आणि पीए संगमा यांनी काँग्रेसच्या आत मध्ये हा आवाज उठवला की काँग्रेस पार्टीचा प्रधानमंत्री उमेदवार हा भारतामध्ये जन्मलेला असला पाहिजे, व इतर कोणताही देशामध्ये नाही. जून 1999 मध्ये हे तिघेही काँग्रेस पक्षामधून वेगळे झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली. जेव्हा 1999 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणालाही बहुमत मिळाले नाही, तेव्हा भारतीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून सरकार स्थापन केले.

सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार युपीए गटबंधन सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांना कृषी मंत्री बनवण्यात आले सन 2012 मध्ये त्यांनी 2014 ची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली कारण तरुण वर्गाला संधी मिळावी.

क्रीडा प्रशासन । Sports administration under Sharad Pawar

शरद पवार यांना कबड्डी खो-खो कुस्ती फुटबॉल आणि क्रिकेट हे खेळ आवडतात. ते या खेळांच्या प्रशासनासोबत देखील जोडले गेले होते. ते खालील दिल्या गेलेल्या सर्व संघटनांचे अध्यक्ष राहिलेले आहेत.

  • मुंबई क्रिकेट एसोसिएशन
  • महाराष्ट्र कुस्ती एसोसिएशन
  • महाराष्ट्र कबड्डी एसोसिएशन
  • महाराष्ट्र खो-खो एसोसिएशन
  • महाराष्ट्र ओलंपिक्स एसोसिएशन
  • भारतीय क्रिकेट कण्ट्रोल बोर्ड
  • अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद् चे उपाध्यक्ष
  • अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद् चे अध्यक्ष

विवादांमध्ये । controversies of Sharad Pawar in Marathi

शरद पवार यांच्या राजकीय जीवनामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या विवादांमध्ये त्यांचे नाव आले. त्यांच्यावर भ्रष्टाचार,अपराधींना वाचवणे, स्टॅम्प पेपर घोटाळे, जमीन घोटाळे इत्यादी गोष्टींमध्ये त्यांचे नाव बऱ्याच वेळा आले.

व्यक्तीगत जीवन । Personal Life of Sharad Pawar in Marathi

शरद पवार यांचा विवाह प्रतिभा शिंदे यांच्यासोबत झाला. शरद पवार यांना एक मुलगी आहे ,ज्या बारामती संसदीय क्षेत्रात सांसद आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रमुख स्थानावर आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. शरद पवार यांचे छोटे बंधू प्रताप पवार हे मराठी दैनिक “ सकाळ ” याचे संचालन करतात.

तर मित्रांनो तुम्हाला हा शरद पवार साहेबांवरील आमचा हा लेख कसा वाटला कंमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला अजून कोणती माहिती पवार साहेबांबद्दल या लेखात समाविष्ट करायची असेल तर ते देखील कंमेंट मध्ये नोंद करा आणि वेळोवेळी हा लेख update करत असतो.

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment